दोन फेकुंची कहाणी

दोन फेकुंची कहाणी

गुजरात निवडणुकीने सारा देश ढवळून निघाला. जाणवेधारी हिंदूचे नीच राजकारण अय्यरने उघडकीस आणले. त्याचा अर्थ मोदीने नीच जातीचा माणूस करून गुजरात पेटवले. मंदिर पर्यटनने कोण श्रेष्ठ हिंदू आहे हे दाखवण्यासाठी ह्याची स्पर्धा लागली.  कॉंग्रेसला पाक चालवतो कि काय? अशी शंका लोकांच्या मनात निर्माण करण्यात यश मोदिना मिळाले. ह्या कुठल्याही बाबी शेतकरी – कामगार – सैनिकांशी संबंधित नाहीत. त्या देशाच्या अधोगतीचे राजकारण आहेत. पण ते निवडणुकांचे मुख्य मुद्दे बनवण्यात नागनाथ भाजप नेहमी यशस्वी होतात. कारण सापनाथ कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सुध्दा हेच विषय अल्पसंख्याक लोकांना गोळा करण्यासाठी वापरतात.  भारताची संपत्ती लुटण्यासाठी सर्व दारे उघडी करून सापनाथ कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि  नागनाथ भाजप  देत आहेत आणि आम्ही पाकिस्तान, मंदिर -मस्जिद, गाय-बैलाच्या राजकारणात गुंतून गेलो आहोत.  रोटी,कपडा मकान विसरलो आहोत.

धंद्यापाण्यात मात्र हे सापनाथ-नागनाथ एक दिसतात. कारण जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण (खाऊजा ) धोरणात दोघे एकच आहेत. उद्योगपतींना मलिदा आणि कामगारांना धोंडा दोघे देत आहेत. आता राफेल लढाऊ विमानाच्या खरेदीबद्दल घ्या. मोदीने फ्रान्स भेटीत २०१६ ला अंबानीला बरोबर घेवून राफेल विमानाची खरेदी प्रचंड पैसे जास्त देवून केली. ४८००० कोटी पासून २०१२ ते २०१५ पर्यंत राफले विमानाची किंमत ६६००० कोटी कशी झाली? खरी किंमत  अजून कुणालाच माहित नाही. संरक्षण मंत्री परिकर अन इतर सर्वांना डावलून राफेल विमाने विकत घेण्यात आली. हे पूर्ण काम अंबानीच्या मध्यस्थीने झाले.

अनिल अंबानी कधीपासून विमानाचा उत्पादक झाला. राजीव गांधीवर बोफोर्समध्ये खोटे आरोप झाले कि  कायद्याप्रमाणे भारतात संरक्षण विषयक खरेदीत दलाल मध्यस्त ठेवता येत नाही. मग राफेलमध्ये अनिल अंबानी कुठून आला. अनिल अंबानी २G घोटाळ्याचा  मोठा लाभार्थी आहे. आत्ताच कोर्टाचा निकाल आला. त्यात ए राजा पासून सर्व आरोपी  सुटले. ही चौकशी सर्वोच्च न्यायालयाने करायला आदेश दिला. सापनाथानी CBI अन ED ला पुढे केले.   त्यात सरकारने चौकशीमधून मुख्य आरोपींना दूर ठेवले. टाटा, अंबानी ह्याचे सर्व गुपित टेप झाले होते. जगजाहीर होते कि टाटांनी नीरा रादियाला ३० कोटी दिले होते. अंबानीने स्वान कंपनीला पुढे करून त्याने २G स्पेक्ट्रम मिळवला. स्वानमध्ये सर्व पैसे त्याचे होते. पण तुरुंगात दुसरे गेले. पण सापनाथने त्यांना वाचवले.  चौकशी आणि आरोपपत्र मुद्दामहून कमजोर केले.  हे न्यायाधीशांनी सुध्दा म्हटले.

राफेलचा जुना करार  सरकारी कंपनी HAL/हाल बरोबर राफेल विमान बनविणाऱ्या  Dassault कंपनीचा करार झाला होता. १२६ विमानाचे तंत्रज्ञान मिळवण्याचे व विमान उत्पादनाची भागीदारी हाल बरोबर होती. ती  रद्द करून आता अनिल अंबानीला राफेल विमाने बनविणाऱ्या Dassault कंपनी बरोबर भागीदारी ठरवण्यात आली. सरकारी म्हणजेच जनतेच्या मालकीच्या कंपनी बुडवण्याचा सापनाथ नागनाथांचा धंदा कसा चालतो पहा. हा धंदा सापनाथ आणि नागनाथानी गेले २५ वर्ष चालवला आहे. आता तर अंबानीला  प्रचंड जमीन नागपूरमध्ये देण्यात आली.  सर्व संरक्षण कंत्राटात ५०% ऑफसेट कलम असते. म्हणजे ५०% खर्च त्या कंपनीने भारतात करायचा असतो. अनिल अंबानीची  कंपनी रिलायन्स ही अचानक मोदी राफेल व्यवहारात कशी आली. ३०००० कोटी ऑफसेट मधील ७०% म्हणजे २१००० कोटी पैसा अनिल अंबानी घेवून जाणार. इतर ३०% पैसा  सरकारी कंपनीला मिळणार. मोदींशिवाय ही गोष्ट कुणालाच माहित नव्हती. अंबानीसाठी अनेक काम करणाऱ्या सरकारी कंपन्यांना बाजूला करण्यात आले. ह्यावर सापनाथ कॉंग्रेस/ राष्ट्रवादी काहीं बोलत नाही. कारण हे पण अंबानीचे पितेच आहेत.

२G घोटाळ्यात CBI चार्ज शीटमध्ये अनिल अंबानीचे नाव नाही. पण ३ वरीष्ट  गौतम दोषी, सुरेंद्र पिपर, हरी नय्यर  आरोपी  आहेत. अनिल अंबानीने स्वान कंपनीला पुढे केले. दुसऱ्या खोट्या कंपन्या जशा पोपट, झेब्रा, चित्ता ह्यांना पुढे केले. त्यात त्याचा कंपन्यांचा पैसा घातला तरी सापनाथ कॉंग्रेस सरकारनी त्याच्यावर कारवाई केली नाही, म्हणून आरोपी सुटले. आता राफेलचे काम अनिल अंबानीने मिळवले.  अनिल अंबानी जर भरपूर पैसेवाला असता तर आम्ही एकवेळ समजू शकलो असतो. पण त्याने प्रचंड कर्ज बुडवले आहे. तो दिवाळखोरीत जाणार आहे. हे माहित असून नागनाथ त्याचा पाठीराखा  का होतो? हे गौडबंगाल काय आहे? आणि मोदिजी भ्रष्टाचारविरुद्ध कसे बोलतात?  कॉंग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देवून मी कॉंग्रेस पक्ष सोडला.  कॉंग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराचा महामेरू आहे. त्याचा जुळा भाऊ नागनाथ आहे.

अचानक राहुल गांधीला आणि सापनाथला मिडियामध्ये चांगले ठरवण्याचा सपाटा चालू झाला आहे. कारण नागनाथ पुढची निवडणूक हरणार आहेत. गुजरात निवडणुकीत मथळे आले कि पराभवात देखील सापनाथ जिंकले. खरी गोष्ट ही आहे कि सापनाथ कॉंग्रेस/राष्ट्रवादी हा चोरांचा आणि दलालांचा पक्ष झाला. सापनाथ कॉंग्रेस भाजपशी टक्कर घेऊच शकत नाही.  मग आता नागनाथांशी  लढणार कोण?  दिल्लीत फिरलो काम बघितले शाहू महाराजानंतर केजरीवालने पहिल्यांदाच विक्रम घडवला २६% बजेटचा हिस्सा त्याने शिक्षणासाठी लावला. सरकारी शाळांना पंचतारांकित केले. सरकारी शाळेत पोहण्याचा तलाव, स्टेडीयम देशात कुठेच नाहीत.  लोक आता खाजगी शाळांच्या ऐवजी सरकारी शाळेत जाणे पसंद करतात. पाणी फुकट केले तरी दिल्ली जल बोर्ड फायद्यात आहे . अर्थसंकल्पाच्या १३% आरोग्यावर खर्च केले. सर्वाना आरोग्य मोफत केले. अगदी पंचतारांकित दवाखान्यात सामान्य माणसाचा इलाज होतो.  सर्वात स्वस्त वीज दिल्लीत आहे. तरी दिल्ली विद्युतबोर्ड फायद्यात आहे. अशी अनेक कामे बघितल्यानंतर मला विश्वास वाटला कि भय, भूक आणि भ्रष्टाचाराविरुद्ध एक आदर्श सरकार दिल्लीत काम करत आहे. मी केजरीवालना भेटलो अनेक विषयांवर चर्चा केली, मग सावित्रीबाई  फुले आणि जिजामाता जयंतीच्या निमित्ताने त्यांनी महाराष्ट्रात यावे, असे निमंत्रण दिले. त्यांनीही लगेच होकार दिला व आता १२ जानेवारीला सिंदखेडराजा येथे सावित्रीबाई फुले आणि जिजाई माताना वंदन करण्यासाठी ही ते येणार आहेत. मी त्यांना म्हटले कि तुम्ही इतके चांगले काम दिल्लीत करत आहात तर महाराष्ट्रात तुम्ही का करत नाहीत? त्यांनी लगेच येथे काम करण्याला होकार दिला व जिजामातेचा आशीर्वाद घेऊन १२ जानेवारीला महाराष्ट्रात सापनाथ नागनाथांना अरबी समुद्रात गाढण्यासाठी व नवीन महाराष्ट्र घडवण्यासाठी अरविंद केजरीवाल येत आहेत. तरी सर्व देश भक्तांनी त्यांचे जोरदार स्वागत करावे ही विनंती करत आहे. मी स्वत: केजरीवाल यांना पूर्ण साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाइट : www.sudhirsawant.com

मोबा. नं. ९९८७७१४९२९

 

Please follow and like us:

Author: Brigadier SS