पाकिस्तानचा हुकूमशहा_२४.३.२०२३

पाकिस्तानचे सरसेनापती आणि नंतर हुकूमशहा जनरल परवेज मुशर्रफ दुबई येथे आपल्या ७९ व्या वर्षी मृत्यू पावले. कारगिल  हल्ला करणारे, तसेच काश्मिर प्रश्र्न सोडवण्यापर्यंत मजल मारणारे मुशर्रफ एक मोहजिर होते. मोहजिर म्हणजे भारतात जन्मलेले आणि नंतर पाक मध्ये गेलेले. एक हुकूमशहा म्हणून त्यांना भारताबरोबर चांगले संबंध …

पौष्टिक भरडधान्ये_9.3.2023

आनंदी जीवनासाठी आरोग्य सर्वात महत्त्वाचे ठरते.  कितीही पैसा कमावला तरी त्याचे सुख मजबूत आरोग्य असल्याशिवाय मिळत नाही.  यासाठी आनंदी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी प्रथम आरोग्यावरच आम्ही भर दिला आहे.  त्यात सर्वात प्रथम पोषक आहार गरजेचा असतो. आधुनिक जीवनशैलीमध्ये वडापावची संस्कृती बाजूला करून भरडधान्यावर लक्ष केंद्रीत…

भारत-चीन मित्र का शत्रू (भाग-१)_२३.२.२०२३

भारत आणि चीनचे संबंध अनेक वर्षापासून पडद्याच्या वेगवेगळ्या पातळीवर वर-खाली होत आहेत. तसं पाहिलं तर दोन्ही देशाच्या इतिहासात दोघांचा कधी संबंध आला नाही. एक शेजारी म्हणून हजारो वर्ष आपण एकत्र राहत आहोत. कधी संघर्ष ही झाला नाही आणि कधी राजकीय संबंधही आला नाही. काही प्रवासी…

शिवराय आणि लोकशाही_१६.२.२०२३

छत्रपती शिवरायांचा काळ हा सरंजामदारीचा होता. शिवराय सुद्धा त्यातीलच एक भाग होते. पण शिवरायांना रयतेचा राजाचा किताब मिळाला. लोकांमध्ये व लोकांच्या हृदयामध्ये त्यांना एक असे स्थान मिळाले, जे देशात कुणालाच मिळाले नाही. आज साडेतीनशे वर्षे झाल्यानंतर सुद्धा शिवराय लोकांच्या मनामध्ये ठसले आहेत, हृदयामध्ये कोरलेले आहेत….

अर्थसंकल्प_२.२.२०२३

२०२३-२४ चा अर्थ संकल्प जाहीर झाला. प्रथमदर्शनी सर्वांनाच आनंद झाला. अमृत कालचा संकल्प अर्थमंत्र्यांनी लोकांसमोर ठेवला. तो संकल्प सर्वांना आवडण्यासारखाच आहे. पण निश्चितपणे ह्या अर्थ संकल्पाचे उद्दिष्ट काय होते? हे समजले पाहिजे. भारताच्या अर्थकारणामध्ये संविधानामधून स्पष्ट दिशा सरकारला देण्यात आली आहे की देशाच्या अस्तित्वाचे कारण…

फ्रेंच आणि माधवराव पेशवे_२०.१.२०२३

संभाजी पुत्र शाहू महाराज गेल्यानंतर मराठा राजकारण हे  षड्यंत्राच्या खाईमध्ये बुडाले,शेवटी १८१८ मध्ये अस्त पावले. दुर्दैवाने मराठासाम्राज्याने सुद्धा इंग्रजांना मोठे करून स्वतःला छोटे केले. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले,स्वराज्याची भूक बाळगून असंख्य मावळ्यांनी आपले बलिदान या मातीसाठी दिले. ते केवळ आपापसात विरोधकरून…

स्त्री सन्मान – जिजामाता, सावित्रीबाई फुले व ताराराणी_१३.१.२०२३

जिजामाता ह्या भारत वर्षात एक प्रेरणादायी मातेचे रूप आहेत. एक योद्धया, एक शाशक, महिलांची रक्षक, १२ जानेवारीला त्यांची जयंती मोठ्या थाटामाटाने साजरी झाली. त्याचबरोबर ३ जानेवारीला सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी झाली.  ह्या दोन महान महिलांचा कुठेतरी मोठा संबंध आहे. भारताच्या सांस्कृतिक परंपरेमध्ये महिलांना कनिष्ठ स्थान…

बिनविरोध सैनिकांची ग्रामपंचायत_५.०१.२०२३

रूही गावामध्ये मला अचानक बोलवण्यात आले. सातारा जिल्ह्याचा तीन हजार लोकसंख्येचा हा गाव. सैनिक फेडरेशन, आम्ही सर्व त्या गावांमध्ये रात्री सात वाजता गेलो, अचानक जल्लोष बघायला मिळाला. येथील ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आली होते, एवढे मला माहित होते.  पण ज्यावेळी ग्रामपंचायत सदस्यांना भेटलो तर आश्चर्याचा धक्काच…

ED_२९.१२.२०२२

१९९२ ला मी लोकसभेत खाजगी बिल दाखल केले. ते बिल १९८८ सालच्या आंतरराष्ट्रीय ठरावाला अनुसरून होते. व्हिएन्नामध्ये ड्रग्स विरोधात एक आंतरराष्ट्रीय संमेलन झाले. जगात फोफावणाऱ्या ड्रग्स किंवा अंमली पदार्थांचा वापर बंद झाला पाहिजे. असा निर्धार सर्व देशांनी एकमुखाने मान्य केला. त्यात सर्वात मोठा भाग पैश्याचा…

काश्मिरचा रक्तरंजित इतिहास_२२.१२.२०२२

काश्मिरचा इतिहास हा रक्तरंजितच आहे. त्याची सहज आणि सोपी कारणे मिळू शकत नाहीत. पण बहुसंख्य मुस्लिम असलेला हा प्रांत भारतामध्ये विलीन होण्यापासून आजपर्यंत कुठल्या ना कुठल्या अडचणीमध्ये सापडला आहे. मोहम्मद अली जिनाने मुसलमानांसाठी वेगळा पाकिस्तान निर्माण करायची मागणी घेतली. वेगळा पाकिस्तान त्यांनी मुसलमानांसाठीच मागितला नाही,…