काळा धंदा (भाग-१)
काळा पैसा म्हणजे गरीबांचा कर्दनकाळ, देशद्रोह्यांचे हत्यार. श्रीमंताची श्रीमंती, राजकारण्यांच्या उत्पन्नाचा पाया. तुमचे आमदार खासदार निवडणुकीत पैसे वाटतात तो काळा पैसा. जो घेतात ते काळ्या पैश्याचे गुलाम. काळ्या पैश्यामुळे भ्रष्टाचार होतो. काळा पैसा नसेल तर भ्रष्टाचार होत नाही. कारण चेकने लाच देता येत नाही. पांढर्या पैश्याने हत्यार खरेदी करता येत नाही. म्हणून दहशतवाद होऊ शकत नाही. स्वर्गीय राजीव गांधी म्हणायचे कि सरकार लोकांना १ रू देते तेव्हा लोकांपर्यंत फक्त १५ पैसे पोहचतात. ह्याचाच अर्थ असा होतो कि सरकार खतासाठी रु ८०००० कोटी अनुदान देते तेव्हा लोकांकडे फक्त रु १२००० हजार कोटी पोहचतात. बाकी रु ६८००० कोटी काळा पैसा बनतो. तो कारखानदारांच्या, मंत्र्यांच्या खिशात जातो. मंत्री मर्सेडीस गाडी/ बंगले घेतो. निवडणूकीत पैसे वाटतो, परत निवडून येतो आणि आणखी गब्बर होतो. कारखानदार आणखी दोन कारखाने घालतो व आणखी श्रीमंत होतो. मरतो तो फक्त शेतकरी आणि कष्टकरी. काळा धंदा सुरळीत चालावा ह्याची काळजी आणि अंमलबजावणी माफिया करते. कारण सर्व धंदा शब्दावर चालतो. फक्त माफियाची दहशत शाब्दिक करारांची अंमलबजावणी करतात. कारखानदारामध्ये आणि सरकारमध्ये जे दलाल असतात ते मराठी नसतात. हे दलाल मंत्र्यांच्या पैश्यांची काळजी घेतात. परदेशी खोटी कंपनी करमुक्त देशात गठीत होते. हवाला मार्गाने त्या कंपनीत हा काळा पैसा गुंतवला जातो. करमुक्त देशात कोणी प्रश्न विचारात नाहीत. ही खोटी कंपनी मोठे वकील बनवतात. त्या कंपनीचे मालक कोणी ड्रायव्हर, शिपाई दाखवले जातात. जसे स्पुर्ती घोटाळ्यात नितीन गडकरींच्या नोकर चाकरांच्या नावावर पैसे दाखवले गेलेत.
असेच १० कि. मी. रस्ता बनवला तर ७० कि. मी. चा खर्च केला जातो. सरकारी हॉस्पिटलमध्ये औषधे मिळतच नाही, कारण औषधे काळ्या बाजारात विकली जातात. हे सर्व सामान्य जनतेचे पैसे मंत्री, माफिया, अधिकारी, उद्योगपतीची टोळी खाते आणि परदेशी बँकमध्ये खोट्या कंपनीत साठवला जातो. जसे मल्ल्याने परदेशात सर्व पैसा नेला. लंडनपासून अनेक ठिकाणी बंगले,गाड्या, जहाज, घेतले. त्यात भारताचे मंत्री संत्री फिरले आहेत. हा भाजपचा खासदार कसा काय पळून जातो? म्हणूनच गृह सचिव वोरा समितीने म्हटले कि भारतावर, भ्रष्ट राजकारणी, माफिया, भ्रष्ट अधिकारी यांचे समांतर सरकार राज्य करत आहे. मोदी म्हणाले होते कि भारताचा $४८० अब्ज पैसा परदेशात आहे. त्यातील वर्षात किती पैसा परत आणला? हा प्रश्न मोदी साहेब पुढच्या निवडणुकीमध्ये लोक विचारणार आहेत.
मोदी साहेबांनी नोटा बंदी केली. मी सुद्धा नोट बदलाला पाठींबा दिला होता. रु १००० आणि रु ५०० च्या नोटा बदलल्या. ते म्हणाले कि काळा पैसा बाहेर काढणार. पण झाले दुसरेच. लोकांना प्रचंड हाल सोसावे लागले. १३९ लोक मरण पावले. ‘मुमे राम, बगल मे छुरी’ ही मोदींची पद्धत. १००० च्या नोटा रद्द केल्या पण रु २००० च्या नोटा निर्माण केल्या? म्हणजे नविन सरकारात जे पैसे खातील त्यांना लपवायला आणखी सोपे झाले. पैसा खाणे सोपे. आता एका छोट्या बॅगमध्ये कोटी कोटी रुपये सहज लपवले जातात. भिंतीत पुरायचे तर आता अर्धी जागा लागते. आम्ही जे नोट बंदीमुळे सोसले ते काळा पैसा वाढवण्यासाठी नाही. तुमचे हे फसवे धंदे लोकांना लवकरच कळले आहेत. आता ताबडतोब रु.२००० च्या नोटा रद्द करा. नाहीतर लोक तुम्हालाच रद्द करतील. रु.२००० ची बंडले दहशतवाद्यांना पोहचविणे सोपे होते. मग कसे तुम्ही दहशतवाद कमी केला. उलट तुम्ही सत्तेवर आल्यावर शांत काश्मीर तुम्ही पेटवला. सर्जिकल स्ट्राइक तुम्ही एकच केला, पण पाकने ४० केले. आपले अनेक जवान शहीद झाले. खोटे आकडे सांगून दहशतवाद कमी झाल्याचे सांगू नका. नोटबंदीमुळे काळा पैसा कमी तर झालाच नाही. पण रु. २००० नोटांमुळे काळा पैसा आणि भ्रष्टाचार वाढला आहे.
नोटबंदीने प्रचंड त्रास सामान्य लोकांना झाला ह्यात कुणालाच शंका नाही. पण GST नंतर तर छोट्या लोकाचे, व्यापर्यांचे, उद्योजकांचे कंबरडेच मोडले. त्यामुळे सरकारचे निश्चित उद्दिष्ठ काय होते ह्यावर संशयाची सुई केंद्रीत झाली आहे. छोटे धंदे बंद व्हावेत आणि फक्त मोठे महाकाय बहुराष्ट्रीय कंपन्या मोठ्या व्हाव्यात असे आहे का? कारण मला प्रत्यक्ष चिदंबरम ह्यांनी सांगितले होते BIG इस BEUTIFUL म्हणजे मोठे हे सुंदर असते. सर्व बँकांना एकत्रित आणून बंकेंचे खाजगीकरण करावे असा डाव मी हाणून पाडला होता. त्यांनाच भर सभेत विचारले होते कि इंदिरा गांधीनी बँकांचे राष्ट्रीयकरण केले त्या काय मूर्ख होत्या का? ह्या प्रश्नाकडे पक्षीय द्रुष्टीकोनातून मी पाहत नाही. कारण कॉंग्रेस भाजप दोनही पक्ष आर्थिकीकरणात एकत्रच आहेत. म्हणून ते एकमेकांच्या प्रमुख नेत्यांना काही करत नाहीत. स्फूर्ती घोटाळ्यात शरद पवारनी नितीन गडकरीना मदत केली व आता अजित पवार मुक्तपणे फडणवीसांच्या कृपेमुळे मजा मारत आहेत.
पण मुख्य विषय भारतीयांच्या परदेशातील पैश्याचा. २०१२ ला HSBC बँकचा घोटाळा उघडकीस आला. त्यात ६०० भारतीयांचा पैसा परदेशी बँकेत सापडला. त्याची नावे भारत सरकारकडे आली. पण मनमोहन सिंघने ते प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करत SIT गठीत करून चौकशी सुरु केली. पण कॉंग्रेस आणि मोदी सरकारने काहींच केले नाही. चौकशी चालू आहे. पुढे जावून २०१६ मध्ये पनामा पेपर्स जागतिक पत्रकार संघाने जाहीर केले. त्यात ६०० भारतीयांची नावे आली. त्यात अमिताभ बच्चन,ऐश्वर्या रॉय, इंडिया बुल्सचे मालक यांच्या खोट्या कंपन्या सापडल्या. पण साधी चौकशी सुद्धा करण्यात आली नाही. उलट पाकिस्तानमध्ये नवाज शरीफ पाक पंतप्रधानाचे नाव आले, तर त्यांना राजीनामा द्यावा लागला. आता तर त्यांच्यावर खटला चालू आहे. मग पाक बरा कि भारत? पनामा पेपर्समुळे ब्रिटन प्रधानमंत्री, रशिया राष्ट्रपती पुतीन, अनेक देशातले मोठे उद्योजक, खेळाडू, बँका सापडल्या आहेत. अनेक देशातील मंत्री संत्री घरी गेले. भारतात मात्र कुणाला काहीच आले नाही. अमिताब बच्चन मात्र दरवाजा बंद करत फिरत आहेत.
आता तर कहर झाला परदेशी पेपर्समध्ये भाजप मंत्री सिन्हा, इंग्लंडच्या राणी, उद्योगपती असे ७०० लोक सापडले आहेत. त्यात देखील अमिताब बच्चनचे नाव शामिल आहे. अर्थमंत्री जैठ्ली यांनी कसून चौकशी करण्याचे जाहीर केले. पण मला खात्री आहे कि हे प्रकरण दाबून टाकण्याचे काम हे सरकार करेल. आता न्यायालयालाच पुढाकार घ्यावा लागेल. सरकारने नावे जाहीर करण्याचे टाळले आहे. म्हणून आपणच शोध लाऊ व ह्या श्रीमंत चोरांना तुरुंगात घालू.
हे पूर्ण प्रकरण दाखवते कि जगात चोराची पैसे लपवण्याची समांतर अर्थव्यवस्था कशी काम करते. अति श्रीमंत लोक १९ टॅक्स मुक्त देशात किंवा विभागात पैसे कसे नेतात आणि बाहेर काढतात. १ कोटी ४० लाख कागदपत्र बेर्मुदातील अप्पेल्बे आणि सिंगापूरचे आणि आशियासिटी मधून मिळाले. भारताचा १८० देशात १९ वा क्रमांक पैसे लपवण्यात लावले गेले आहे. त्यात ७१४ भारतीयांची नावे आहेत. हे अति श्रीमंत लोक त्यात राजकारणी, बहुराष्ट्रीय कंपनी, सीने जगातील लोक संस्था, प्रतिष्ठान, खोट्या कंपनी कशा पैसे लपवतात ते जाहीर झाले. कॉंग्रेसचे अनेक मंत्री, मल्ल्या देखील ह्यात आघाडीवर आहे. ह्यालाच मोदी म्हणाले होते कि हा सारा पैसा परत भारतात आणला तर प्रत्येक नागरिकाच्या बँकेमध्ये रु १५ लाख घालता येतील. पण मोदिसाहेब १५ लाख सोडा पण १ रु तरी आणा. मग कशाला वल्गना मारता कि नोटबंदीमुळे काळा पैसा संपला? तुम्ही तर तो वाढवला आहे. …… भाग २
लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत
वेबसाइट : www.sudhirsawant.com मोबा. नं. ९९८७७१४९२९ |